झी मराठी अवॉर्ड मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या नामांकनात लाडक्या यशचे नाव नसल्याने चाहते भडकले.. म्हणाले “सोहळ्यावर बहिष्कार टाका.”.

0

झी मराठी अवॉर्ड्स हा केवळ कलाकारांचा सोहळा नाहीतर मालिकेतील कलाकारांचा सन्मान करणारा सोहळा म्हणून प्रचलित आहे. सालाबादप्रमाणे या ही वर्षी अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने आणि थाटामाटात नुकतंच याच्या नामांकनाचा सोहळा पार पडला.

झी मराठी अवॉर्ड्स २०२२ ची नॉमिनेशन पार्टी मुंबईत मोठ्या दिमाखात पार पडली. यावेळी कोणता कलाकार, कोणती जोडी, कोणती मालिका, कोणतं कुटुंब सर्वोत्कृष्ट ठरेल याचे नामांकन जाहीर करण्यात आले. मात्र या नामांकनावर प्रेक्षक प्रचंड नाराज झाले आहेत. याचे कारणही तसेच आहे.

झी मराठी वाहिनीवर वरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रसारित झाल्यापासूनच प्रेक्षकांच्या मनात रुजू झाली आहे. या मालिकेत सातत्याने येणारे ट्वीस्ट आणि यश नेहाची प्रेमकहाणीमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे. या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे हे दोघे प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे.

त्यासोबतच परीची भूमिका साकारणारी बालकलाकार मायरा वायकुळलाही विशेष पसंती मिळत आहे. इतकंच नव्हे तर अभिनेता संकर्षण कऱ्हाडे, प्रदीप वेलणकर या कलाकारांमुळे मालिकेमध्ये जीव ओतण्याचे काम केले आहेत. मात्र या मालिकेला सर्वोत्कृष्ट नायक या विभागात नामांकन देण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रेक्षकांनी संतापून यावर टीका केली आहे.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील यश हे मुख्य पात्र अभिनेता श्रेयस तळपदे साकारतो आहे. या मालिकेमुळे श्रेयस तळपदेच्या चाहता वर्गात कमालीची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे यश हे पात्र पुरुष वर्गातील संवेदनशील व्यक्तीचे नेतृत्व करतोय त्यामुळे अनेकांना तो आपल्यातीलच एक आहे असे साहजिकपणे वाटते. त्यामुळे अनेक जण यश या पात्रावर भरभरुन प्रेम करताना दिसत आहे.

दरम्यान, यंदाच्या झी मराठी अवॉर्ड्स सोहळ्यात या मालिकेला सर्वोत्कृष्ट कुटुंब, सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा, सर्वोत्कृष्ट नायिका, सर्वोत्कृष्ट खलनायिका यांसारख्या विविध विभागात नामांकन देण्यात आले आहेत.

पण यातील महत्त्वाचा विभाग असलेला सर्वोत्कृष्ट नायक या विभागात या मालिकेला नामांकनच देण्यात आलेले नाही. त्यामुळे अनेक प्रेक्षकांनी झी मराठी अवॉर्ड्स सोहळ्यावर तसेच झी मराठीवर नाराजी व्यक्त केली आहे. अनेक नेटकरी यावर कमेंट करताना दिसत आहे. काहींनी तर या सोहळ्यावर बहिष्कार टाका, असेही म्हटले आहे. यातील काहींनी पट्यासाठी म्हणजे अभिनेता स्वप्निल जोशीसाठी श्रेयस तळपदेला डावलले असा आरोपही केला आहे.

दरम्यान या संपूर्ण प्रकरणी अद्याप झी मराठी वाहिनीकडून काहीही स्पष्टीकरण आलेली नाही. तसेच श्रेयस तळपदे किंवा या मालिकेतील कोणत्याही कलाकारांनी यावर काहीही प्रतिक्रिया आतापर्यंत दिलेली नाही. हा सर्व प्रकार चुकून झाला की याबद्दलही अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप